गहू पिकासाठी पहिली फवारणी: गहू उत्पादक शेतकरी मित्रांनो, रब्बी हंगामात गव्हाचे चांगले उत्पादन घेण्यासाठी योग्य वेळेत खत व्यवस्थापन आणि फवारणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गहू पीक साधारणपणे एक महिन्याचे झाल्यानंतर पहिली फवारणी घेणे गरजेचे आहे. तणनाशक मारून आणि पिकाला पाणी दिल्यानंतर, शेत वापसा (जमिनीत योग्य ओलावा) स्थितीत आलेले असताना ही फवारणी केल्यास तिचे सर्वोत्तम परिणाम दिसतात. या पहिल्या फवारणीचा मुख्य उद्देश म्हणजे पिकाचा फुटवा मोठ्या प्रमाणात वाढवणे आणि सध्याच्या ढगाळ-धुक्याच्या वातावरणामुळे वाढणाऱ्या किडींवर व रोगांवर नियंत्रण मिळवणे हा आहे.
पिकाचा फुटवा वाढवण्यासाठी आणि त्याची पोषणक्षमता सुधारण्यासाठी पहिली फवारणी करताना 12:61:00 वापरण्याचा सल्ला दिला जातो. जमिनीचा pH लेव्हल (आम्ल-क्षार पातळी) जास्त असल्यास, दाणेदार खते पिकाला लवकर उपलब्ध होत नाहीत, परंतु फवारणीद्वारे दिलेले खते लगेच शोषले जाते, ज्यामुळे पिकाला फॉस्फरसचा पुरवठा होतो. चांगल्या फुटव्यासाठी आणि पुढे ओंब्या (ear heads) चांगल्या निघण्यासाठी याचा मोठा फायदा होतो.














