हरबरा नवीन तननाशक ; पहा फवारणी करताना काय काळजी घ्यावी ; हरबरा तन नियंत्रनासाठी शेतकरी हरभरा १५ ते २० दिवसांचा झाल्यावर बकऱ्या सोडण्याचा पर्याय निवडतात. तर काही शेतकरी टोप्रामीझॉन (उदा. टिंजर किंवा इलाईट) या मक्यासाठी शिफारसित असलेल्या तणनाशकाचा वापर करतात. मात्र, हे तणनाशक वापरल्यास हरभरा पिकाला मोठा धक्का बसतो, त्याची वाढ तात्पुरती थांबते आणि उत्पादनात घट होते.
अशा परिस्थितीत, पिकाचे नुकसान टाळण्यासाठी, टोप्रामीझॉनचा वापर केल्यास त्वरित एकरी २५ ते ३० किलो युरिया फेकून लगेच स्प्रिंकलरने पाणी देणे आवश्यक आहे. पाणी दिल्यानंतर हरभऱ्याला लवकर सावरण्यासाठी इसाबियन आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची (मायक्रोन्यूट्रिएंट्स) फवारणी करावी.














